विशेष प्रतिनिधी
पर्वरी
ॲक्युपंक्चर ही एक अशी उपचारपद्धती आहे जिच्यामुळे कुठलीच शस्त्रक्रिया न करताही असाध्य रोग बारा होऊ शकतो. यासाठी रुग्णाचा आत्मविश्वास बळकट करणे गरजेचे आहे. रुग्णांनी सदैव सकारात्मक विचार करावा, असे मत गोव्यातील प्रसिद्ध ॲक्युपंक्चर तज्ञ डॉ. एम. बी. प्रभू यांचे सुपुत्र डॉ. साईश प्रभू यांनी सांगितले. तरुण भारताच्या प्रतिनिधीने खास त्यांच्या ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीविषयी माहिती जाणून घेतली. डॉ. साईश प्रभू हे २९ वर्षीय युवक असून चीन या देशात जाऊन ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीवर १०वर्षे चिनी भाषेत अभ्यास करणारे ते भारतातील पहिले युवा डॉक्टर आहे. आज ते स्वतः आपले वाडील डॉ. एम. बी. प्रभू यांच्या पर्वरी येथील इस्पितळामध्ये काम करत आहे. ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीने देशातीलच नव्हे तर देशाहेरील रूग्णांना देखील असाध्य आजारापासून रोगमुक्त करत आहे.
लहानपणापासून ॲक्युपंक्चर विषयी कुतूहल
जेव्हा मी लहान होतो तेव्हा वडिलासोबत इस्पितळामध्ये जायचो माझे वडील रुग्णांना सुई टोचून उपचार करत होते हे पाहत होतो. सुई टोचून रुग्ण बारा होतो हे मला प्रथम अचंबित वाटत होते. हळूहळू मला त्याची आवड होत गेली त्यामुळे मलाही तेव्हाच अशी उपचार पद्धती शिकून रुग्ण सेवा करण्याची इसचा झाली . माझ्या वडिलांची लोकप्रियता पाहून मीही त्याच मार्गाने जाण्याचे ठरविले, म्हणून मी ॲक्युपंक्चरविषयी शिक्षण घेण्यासाठी चीनमध्ये जाण्याचे ठरविले. ॲक्युपंक्चर बद्दलची सखोल माहिती घेण्यासाठी चिनी भाषेतील पुरातन पुस्तके वाचणे फार गरजेचे होते त्यासाठी चिनी भाषा शिकून त्यातील पुष्कळ गुपित समजून घेणे हे माझे स्वप्न होते. म्हणून मी चिनी भाषेत प्रभुत्व मिळवून चिनी विध्यार्थी बरोबर चिनी भाषेत ॲक्युपंक्चरचे सखोल ज्ञान प्राप्त केले. असे यावेळी डॉ. साईश प्रभू यांनी सांगितले.
चीनमध्ये शिक्षण घेणे होते आवाहन
एखाद्या दुसऱ्या देशात जाऊन त्यांच्या भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणे खूपच अवघड होते. तत् चिनीभाषेत शिक्षण घेणे म्हणजे एक मोठे आव्हाहनच होते. जसे भारताचा आयुर्वेद हा जुना औषधीउपचार प्रणाली आहे असेच चीन ह्या देशात ॲक्युपंक्चर ही खूप जुनी उपचार पद्धती मानली जाते. जगभरातील विध्यार्थी शांगघाई येथील या विश्वविद्यालयामध्ये हे शिक्षण घेण्यासाठी येतात. सुरवातीला या देशातील भाषा शिकणे हे मझ्यासाठी मोठे आव्हाहन होते. चीनमध्ये आधुनिक भाषा व जुनी चिनी भाषा असे दोन प्रकार आहे. उपचार पद्धती पुरातन असल्याने जुन्या चिनी भाषेत शिक्षण घेणे महत्वाचे असते. त्यामुळे प्रत्येक शब्दाचे अर्थ हे चिनी भाषेत वेगवेगळे काढले जातात तरी हिम्मत व आत्मविश्वासच्या जोरावर ही उपचार पद्धती शिकून घेतली. त्या नंतर जागतिक ॲक्युपंक्चर डॉक्टर प्रतियोगिते मध्ये भाग घेण्यासाठी फार परिश्रम घेऊन वेगवेगळ्या प्रतियोगितात भाग घेऊन उपांत्य फेरी पर्यंत पोचलो आणि नंतर जागांमधून आलेल्या ४५० चिनी डॉक्टर मधून ३ क्रमांक पटकाविण्याचा मन मला मिळाला. चीन मध्ये शिक्षण घेत असताना मला माझ्या मातृभूमीची तसेच खाद्य पदार्थांची खूप आठवण येत होती. तरी हा टप्पा पार केल्याने आज मला आनंद होतो आहे, असे डॉ. साईश प्रभू यांनी सांगितले.
अनेक रुग्णांना निरोगी बनविले
गोव्यात गेली ३२ वर्षे आम्ही ॲक्युपंक्चर उपचाराची सेवा देत आहोत. आजपर्यंत लाखो रुग्ण या रुग्णालयातून बरे होऊन गेलेलं आहे. गोव्यातीलच नव्हे तर परराज्यातील, परदेशातील रुग्ण या ठिकाणी बरे होऊन गेले आहे. अनेक असाध्य आजारावर ॲक्युपंक्चरने उपचार केले आहे. या रुग्णालयामध्ये स्पॉनडिलायसिस, पॅरालिसिस, बेल्स पल्सचे, स्लिप डिस्क, सायटिका, फ्रोझन शोलडर, बॅक पॅन, अस्थमा, कमी ऐकू येणे, निद्रानाश, असिडिटी, व इतर अनेक आजारांवर उपचार ह्या रुग्णालयात केले जातात. अनेक तज्ञ डॉक्टर सारक-गोआ हॉस्पिटल मध्ये उपचार घेतात व त्यामुळे त्यांचा ॲक्युपंक्चर पद्धतीवर विश्वास आहे व अश्या प्रकारच्या असाध्य रोगांवर उपचार घेण्यासाठी रुग्णांना इथे पाठवतात. रुग्णांनी या रुग्णालयात शेवटच्या क्षणाला येऊन उपचार घेण्या ऐवजी सुरवातीला उपचार घेतला तर तो रुग्ण फार लवकर बारा होतो. पण अनेक रुग्ण हे अगोदर सर्व उपचार करतात तिथे त्यांना काहीच फायदा न झाल्यावर ते भयानक परिस्तितीत शेवटच्या क्षणाला येथे येतात त्यातून त्यांना चांगले करण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. महत्वाची गोस्ट म्हंजे जे रुग्ण बरे होतात ते कायम स्वरूपी चांगले होतात. आणि ते सदोदित डॉक्टरांच्या संपर्कात मित्रा सारखे राहतात अश्या प्रकारचे स्वस्त झालेल्या रुग्णाचे किती तरी विडिओ तुम्ही www.sarcgoa.com वर पाहू शकता असे डॉ. साईश ने सांगितले.
रुग्णांनी सकारात्मक विचार करावा
तसे पहिले तर रुग्ण हा स्वस्ताच्या आत्मविश्वासावर निरोगी होत असतो. जर आमचा आत्मविश्वास बळकट असेल तर आम्ही कुठल्याही रोगावर मात करू शकतो. आम्हाला एखादा रोग झाला तर आम्ही अगोदर आमच्या डोक्यात नकारात्मक विचहर आणतो. त्यामुळे तो रोग माणसाला ग्रासत जातो. अश्या वेळी कितीही डॉक्टर केले औषधोपचार केले तरी त्याचा योग्य परिणाम जाणवत नाही. त्यामुळे सर्व प्रथम रुग्णांनी सकारात्मक विचार ठेवला पाहिजे. आज आपण खूप आधुनिक झालो आहोत. अनेक उपचार पद्धती आलेल्या आहेत तरी आज आमची जगण्याची क्षमता खूप कमी झाली आहे. आज किमान माणसाचे आयुष्य ६० वर्ष्यापर्यंत आले आहे. पूर्वीचे लोक हे १००ते १२० वर्षे जगत होते. त्यावेळी अशा प्रकारची मॉडर्न उपचार पद्धती अली नव्हती. आता माणसे विकसित होऊनही असा प्रसंग आला आहे याचा गांभीर्याने आम्ही विचहर करणे गरजेचे आहे, असेही डॉ. साईश प्रभू यांनी सांगितले.